Friday, June 30, 2017

यश मेहनतीने व जिद्दीने मिळते नुसत्या ज्ञानाने नाही....




👴 एक अशिक्षीत गरीब राम नावाचा माणूस
एका देवळात
🔔घंटा वाजवण्याचे
 काम करत असतो..

 तो ते काम अतिशय
 श्रद्धापूर्वक करत असे...

आता तो🔔👴
घंटेचा माणूस
या नावाने
ओळखू लागला...


कालांतराने
या देवस्थानाचे
महात्म्य वाढले...

बाहेरच्या प्रदेशातील लोक
 देवस्थानला भेट देण्यासाठी
 येउ लागले...

तसेच
विदेशी लोकही
येउ लागले...

देवस्थान कमिटी
 नव नविन सुधारणा
 करू लागले...

👴त्याला बोलवून
 कमिटीने सांगीतले की
 लवकरात लवकर
इंग्लीश बोलणं शिकून घे...

मि निरक्षर
 मला कसे येणार इंग्लिश..?
तो वारंवार सांगु लागला.

परंतू
कमिटीने सांगून टाकले की
 प्रत्येकाला इंग्लिश
आलचं पाहीजे...

त्याने खूप प्रयत्न केला.
पण काही केल्या
त्याला इंग्लिश काही जमेना...

शेवची व्हायचं तेच झालं...

त्याला कामावरून
 काढून टाकले...

बिचारा तो
 त्याला काही सूचेना.. .

त्याचे डोके दुखु लागले
म्हणून ☕चहा प्यायला
बाहेर पडला...

 पण
 जवळपास
चहा गाडा नव्हता...

अर्ध्या कि.मी.
चालाव लागलं...

परंतू

जाताना त्याने पाहीले की
 इथे फक्त
💐🍒🍇फूलांचे -फळांचे
 नारळाचे दुकान हाेते...

चहा साठी लोकंना
 खूप लांब पर्यंत चालत
 जावं लागत असे...

आता त्याने ठरवलं की
 आपण देवळाजवळ
☕ चहाचा गाडा
सुरू करायचा...

आणि
दुसर्याच दिवशी त्यानी
 गाडा सूरु केला...

थोड्या दिवसाने
त्याच्या पत्नीने पण
नाष्टाचे पदार्थ करून
गाड्यावर ठेऊ लागली...


कालांतराने
छोट्या गाड्या वरून
प्रशस्त हाेटेल झालं...

त्याच्या मेहनतीने कालांतराने
नंतर ३ स्टार हाँटेल झाले.
कालांतराने
🏢 ५ स्टार झालं...

आता आजूबाजूला
४-५ हाेटेल होती त्याची...


आता त्या राज्यात
त्याच्या सारखं हॉटेल
 कोणाचेच नव्हते...

एकदा दुसर्या राज्यातील
 शिष्ट मंडळ त्यांच्या कड
 हॉटेल सूरू करण्यासाठी
 त्याच्या बरोबर
 करार करण्यासाठी आले...

ठरल्या प्रमाणे करार झाला..

करारावर सही करण्यासाठी
 कागदपत्रे
त्याच्या च्या पूढे ठेवले...

 त्यावर
त्याने डाव्या हाताचा
अंगठा पुढे केला...

आलेले सर्व
अचंबित झाले...

 त्याचा प्रमुख म्हणाला...

५-५  5 STAR हॉटेलचा मालक
 साधा सही करण्या इतपत इंग्लिश
 येउ नये..?

या वर
तो हसला व म्हणाला...
इंग्लिश शिकलो असतो
 तर आज 🏯देवळात
 '🔔'वाजवत बसलाे असतो..!!!

तात्पर्य:- यश मेहनतीने व जिद्दीने मिळते नुसत्या ज्ञानाने नाही....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Sunday, June 25, 2017

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत.......


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? काव्याच्या दृष्टीने
थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं
आणि आमचं अगदी सेम असतं ! मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं; व्याकरणात चुकलात तरी प्रेम
करता येतं; कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं ! सोळा वर्षं
सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे
झुलू लागतात ! आठवतं ना,
तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्याने
भरली होती ! लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडीसकट
बुडता बुडता वाचलो होतो ! बुडालो असतो तरीसुद्धा चाललं
असतं, प्रेमानेच अलगद वर काढलं असतं ! तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं ! कारण, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं
आणि आमचं अगदी सेम असतं ! प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं
भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात ! असाच
एक जण चक्क मला म्हणाला, “आम्ही कधी बायकोला फिरायल
नेलं नाही; पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?” त्याला वाटलं
मला पटलं ! तेव्हा मी इतकंच म्हटलं, “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !” तिच्यासोबत पावसात
कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल
गोडीने ! भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास
फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत
शिरला असाल ! प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम
कधी भांडतंसुद्धा !! दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट
मिठीसुद्धा प्रेम असतं !

Thursday, June 22, 2017

💐तुमच्या सारख्या गोड माणसा साठी💐 ..... 🌹शुभ सकाळ🌹

१ )🍃🍃 *शुभ सकाळ* 🍃🍃़़
*खुप कमी भाग्यशाली लोक असतात..की ज्यांच्या कडे अशी सुंदर माणसं असतात की त्यांच्या एका*
*Good morning ने समोरच्याचा संपूर्ण*
 *दिवस चांगला..जातो....*
*मी पण स्वता:  भाग्यशाली च आहे..कारण माझ्या कडे तुमच्या सारखी सुंदर माणसं आहेत.*
   

2 )🌞🌺शुभ सकाळ🌺🌞☕

💙🌿🌼🌿🌺🌿🍁🌿💙
 Ashikesh Shete:
💐🍃💐🍃💐🍃💐🍃
          *रोज स्वत:ला सांगा:*
       आजचा दिवस खुप सुंदर आहे.
        मला जे वाटते त्यापेक्षा बरेच जास्त काहीतरी करण्याची क्षमता माझ्यात आहे.
           रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात.
          आज मी स्वत: आनंदीत राहीन आणि इतरांनाही आनंद देईन.
         जीवन खुपच सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार...!!!


  3 )।। शुभ सकाळ।।
⚜⚜⚜⚜⚜❣⚜⚜⚜⚜⚜
*🌺जगात सर्व काही आहे*✨
*परंतु समाधान नाही,*
*आणि आज माणसांमध्ये*
*सर्व काही आहे,*
*परंतु धीर नाही.💐*
  *जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो,*
*आधार कुणी नाही देत परंतु*
*धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो..*
     *"माझं" म्हणून नाही.*
*""आपलं"" म्हणून "जगता" आलं ✨✨पाहिजे...*
*"जग" खुप "चांगले" आहे.*
*फक्त .........""चांगलं वागता"" आलं पाहिजे

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
4 )
Ashikesh Shete :
🍃🍃 *शुभ सकाळ* 🍃🍃़़

*👏मी मोठा की तू मोठा....*
*यातच आयुष्य संपून जात...*

*सर्वांपेक्षा मोठा...तो वरती बसलाय.....*

*हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..!*
*स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा,* *खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.....*
*रक्त  गट कुठलाही  असो,*
*रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!
       
   5 )
🍃🍃 *शुभ सकाळ* 🍃🍃़़
👌गोड आठवणी आहेत
           तेथे हळुवार
           भावना आहेत..
हळुवार भावना आहेत तेथे
              अतुट प्रेम आहे.👌
         आणि जिथे अतुट
प्रेम आहे तेथे नक्कीच..
🙏तुमच्या सारखी माणसे
                आहेत..🙏
        🌹शुभ सकाळ🌹

Tuesday, June 20, 2017

🌹 जोक्स वाचण्यापेक्षा खालील अवश्य वाचा, आजच्या पिढी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे. परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला... संगीत विशारद बनायला. Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत. आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे, ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की "what is square of 12?" असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात. श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-" तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?" तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात. ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत. शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन !! खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त WhatsApp , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो. ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे. अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत. guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत. लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय....पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील... अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?... असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. "निप्पोन technology " ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात. प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते. शिक्षण काय असतं? रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा. टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?” टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या- बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. माझं शरीर आता साथ देत नाही. “ thanks.... टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात. आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!

*वडीलावर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!* ***************

*बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!* *************** न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी "आजपासून एकटी झोपणार म्हणते" तेंव्हा ती मोठी होते .... **** शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून "सांभाळून बाबा" असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते..... *** दोन केक आणी आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज "बाबा एक घास हवा का?" विचारते तेंव्हा ती मोठी होते..... *** जरासे लागलं की, आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज "बाबा ङोक दुखतय का? बाम लावू का ?" विचारते तेंव्हा ती मोठी होते...... *** चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला पाहीजे तर माझ्या बॅग मधले पैसे घ्या" म्हणते तेंव्हा ती मोठी होते....... *** मिकी माऊस आणी छोटा भिम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का ?" असं विचारते तेंव्हा ती मोठी होते....... *** बाहेरगावी कामाला जाताना बाबा जाऊ नको ना ssss म्हणत बॅग आत नेवून लपवणारी मुलगी आज "बाबा तुमची बॅग भरू का विचारते" तेंव्हा ती मोठी होते...... *** पटकन मोठी झालेली, ती लग्न करून जाताना "बाबा रङू नको" म्हणत स्वतः धाय मोकलुन रङते.. तेंव्हा मात्र, ती परत लहान होते... तेंव्हा मात्र, ती परत लहान होते... **** शेवटच्या चार ओळीत सारे सामावले आहे. वेगळे अजून काय सांगू ? पण एक लक्षात ठेवा ग मुलींनो,तुम्ही म्हणजे बाबाच्या काळजाचा तुकडा असता. *मुलावर 'प्रेम' असेलही बाबांचे पण मुलीवर "जीव" असतो...* म्हणूनच तुम्हीही त्याला जीवापाड जपा. त्याला तुमच्याकडून फार काही नको असतं. फक्त निखळ प्रेम हवं असतं.. आणि त्या प्रेमापुढे जगातलं कोणतंही "सैराट" प्रेम हे फिकेच आहे. बाप होता म्हणून तर तुम्ही हे जग पाहू शकलात, या एका गोष्टीसाठी का होईना, त्या बाबाला, तो कधी नकळत चुकलाच तर मन मोठे करून माफ करा.. 😔👏👌 LOVE U Pappa😘😍❣

Monday, June 19, 2017

College List

Dear Friends, Please find below college list from Maharashtra : Thank you :)

Saturday, June 17, 2017

About me

Hello,

I am Ashikesh Shete from Malshiras.

Contact me :

Mobile Number - 8007222461
Facebook - https://www.facebook.com/ashikesh.shete

Thank you.

Hello World !!!


Hello world !!!

Developer Survey

Take out Developer Survey and win iPhone X. Thank you.